Wednesday, 3 July 2019

पर्यावरण

वाट पाहून किती
थकून गेली धरा
झाडांचे महत्त्व
आता तरी जाण जरा.

नको करूस वृक्षतोड
निसर्गाची होईल हानी
पाऊस मग पुन्हा
रचेल पाण्याविना नवी कहानी...

आत्महत्या करण्यांस
नको जावूस तू मानवा
पर्यावरणाचा घे ध्यास मनी
मागशील तू  जोगवा..

©®अनिता कळसकर

हरितक्रांती येईल
अवनीवर जेव्हा
हिरवळ मनी
दाटेल की तेव्हा....

साधतो समतोल
कसा जीवनाचा
अर्थ कळेल की तसा
निसर्गात रमण्याचा..।

संवर्धन करू
वृक्ष लागवडीचा
जपू वारसा हा
निसर्गाच्या सानिध्याचा..

✍️©®अनिता कळसकर
             कल्याण

No comments:

Post a Comment